Telegram Group Search
🚩महाराजांच्या काळात कोणी महिलांच्या अब्रुवर हात टाकला तर डावा हात आणि उजवा पाय कापण्यात येत होता... त्याला चौरंगा म्हणत...

आरोपींची अशी अवस्था बघून कोणाची हिंमत होत नव्हती...

सध्या कायदे न्यायालयीन प्रक्रिया याबद्दल भिती राहिली नाहीये.....

म्हणून अशी विकृती वाढत गेली आहॆ....

कालपासून आपल्या मुलींना स्वसंरक्षण शिकवा वगैरे वर पोस्ट वाचतोय पण लहानग्या वर्षांच्या मुलींचं अश्या नराधमांसमोर काय चालणार ??

मुळात समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचं करतोय इतकी समज तरी त्या चिमुरड्यामध्ये असते का ?

नेहमी अश्या काही गोष्टीं झाल्या की समाज उद्विग्न होतो आंदोलनं होतात आणि कालांतराने पुन्हा सगळं शांत होतं...

पण जो पर्यंत कायदे कडक होत नाही तोपर्यंत असे प्रकार थांबतील असं वाटत नाही....

कारावास वगैरे नाही सरळ फाशीची शिक्षा हवी कोणाची हिंमत होणार नाही बलात्कार करण्याची...
शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्यव्यवस्था, सैन्यरचना कशी होती ते पाहू :

गनिमी काव्याबद्दल मी नवीन सांगायला नकोच. शिवाजी महाराजांनी ही नीती पाठीशी सह्याद्री असल्यामुळे अंगीकारली होती. तसेही मराठ्यांचे बळ तेव्हा एवढे नव्हते की मैदानी युध्द करुन ती जिंकावीत व प्रदेश काबीज करावा. शिवाजी महाराजांनी सैन्याची तत्कालीन पद्धतच अंगीकारली होती पण त्यांची बारीक नजर सैन्यावर राही..

सर्व सैन्यास डोईस मंदील, अंगास सकलादी, हाती सोन्याची वा रुप्याची कडी, हुद्याप्रमाणे तलवारीस सोन्या/ रुप्याचे म्यान, कानास कुड्यांची एक जोड अशी हुजुरातीची (म्हणजे खासे महाराजांसोबत जी फौज चाले अशी) फौज तयार केली. त्या फौजेत शंभर लोक, साठ लोक, तीस लोक अशी पथके होती. काही जणांकडे बंदुकी, काही विटेकरी, भालकरी, धारकरी अशी विभागणी केली गेली. पागेत शिलेदार होते, हर घोड्यास एक बारगीर, पंचवीस बारगीरांवर एक हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमला. जुमलेदारास ५०० होनांचा तनखा. दहा जुमल्यास एक हजारी आणि पाच हजारास एक पंच हजारी व पाच पंचहजार्‍यांवर एक सरनौबत अशी फौजेची रचना होती..

(मुगली सैन्य या विरुद्ध- सोबत जनानखाना, कलावंतिणी, जवाहीर असे सर्व बाळगीत. युध्द हरण्यास हे सर्व कारणीभूत होई कारण पटापट हालचाल करता येत नसे. पुढे मराठ्यांनी हे सर्व बाळगायला सुरुवात केली. पानपतावरच्या मराठ्यांच्या पराभवास हे बाजरबुणगे व जनानखानाच कारण ठरले.) तसेच परमुलुखांत पोर, बायका धरण्यास मनाई होती. मर्द लोक सापडले तर धरावे, गाय धरू नये, बैल धरावा, ब्राम्हणांस उपद्रव देऊ नये तसेच खंडणी केलेल्या जागी ओळख म्हणून ब्राम्हण घेऊ नये असे नियम होते.. (सभासद बखर).

सरनौबत, मुजुमदार यांची तैनात वराता अथवा हूडीने देत. लष्करास गाव मोकासा देण्याची पध्दत बंद केली. सर्व व्यवहार रोखीने होत. मोकासे दिल्याने रयतेस त्रास होतो, धारा नीट वसूल होत नाही म्हणून ती पद्धतच बंद केली. लढाईत जखमी झालेल्यांना जखमेप्रमाणे नेमणूक मिळे, मेलेल्यांना तैनात देण्यात येई..
छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ मे १६७१ चे एक पत्र :
.
"चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही..! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा.."
वरील पत्रावरून दिसून येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते..
.
――――――――――――
🎨 @rambdeshmukh 👌🏼♥️🔥
महाराष्ट्राला निसर्गतःच भरभरून लाभलेले सह्याद्रीचे हे सौंदर्य...!
ऊन पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात कायम साथीला असलेला, पावसाळ्या हवेत अनुभवणे असा हिरव्या गालिच्छा मध्ये हा गड सोनकी तेरड्याच्या रानफुलांच्यात सजलेला, मराठे शाहीचं वैभव म्हणजेच किल्ले “राजधानी रायगड”...🚩

या किल्ल्यावर आज अवशेष रूपात असलेल्या वास्तुरचनांचा अभ्यास केला म्हणजे त्या काळातील वास्तु वैभवाची कल्पना येते, ती हेमाडपंती पद्धतीने बांधलेले महादेवाचे मंदिर म्हणजेच “सह्याद्रीचा जगदीश्वर”...

चारी बाजूंनी डोंगररागांपासून तुटलेल्या, अत्यंत दुर्गम, दर्या अन देशापासून समांतर असलेल्या या किल्ल्यावर राजांनी एवढे भव्य दिव्य विश्व निर्माण केले की, शेवटी मराठी अस्मिता ही येथूनच सुरु होते...! इथूनच मिळते बळ जगण्याचे, उमेद कर्तुत्वाची आणि ताकद निश्चयाची.. एवढे थोरले विश्व निर्माण करणारा हाच तो खरा सह्याद्रीचा जगदीश्वर...🙏🏼🚩

✍🏽 @sachinpokharkar_


📷 रुपेश वनारसे 👌🏼♥️🔥
शिवकाळात छत्रपती शिवरायांची निष्ठावंतांची फौज...🚩

● निष्ठा व निष्ठावंत दोन प्रकारचे असतात :
एक आपल्या नेतृत्वावर कोणताही वैयक्तिक स्वार्थ अथवा अपेक्षेविना पूर्णपणे विश्वास ठेवणारे अढळ निष्ठावंत. व दुसरे आपले काम व्हावे या भावनेने काम होईपर्यंत नेतृत्वावर विश्वास ठेवणारे हंगामी निष्ठावंत..

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली, तेव्हा हजारो मावळे शिवरायांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाले. त्यातील कोणाच्याही मनात ना जहागिरीची लालसा होती, ना इनामांचा लोभ ! होता तो फक्त नेतृत्वावर ठाम विश्वास ! आपले महाराज जे काही करताहेत ते आपल्या भल्यासाठीच आहे, या एकाच भावनेने मावळ्यांनी महाराजांच्या चरणी आपल्या निष्ठा अर्पण केल्या होत्या. महाराजांच्या कोणत्याही निर्णयावर कोणत्याही मावळ्याने शंका घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्यबळ त्याकाळी मोजकेच होते, मात्र त्यातील हरएक सैनिकाची निष्ठा राजगडाच्या अभेद्य बुरुजांसम अढळ होती. महाराजांविरुद्ध लढणारेही बहुतांश स्वकीयच होते मात्र मोजक्या निष्ठावंतांच्या जोरावरच शिवराय महाराजांनी स्वराज्य उभारले. आपण स्वतंत्र व उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहोत तेच आपल्या विरुद्ध शस्त्रे घेऊन उभे आहेत म्हणून महाराज कधी डगमगले नाहीत.. "मानसिक धैर्य काय असते हे शिवरायांकडून शिकावे व स्वामीनिष्ठा काय असते हे महाराजांच्या मावळ्यांकडून शिकावे......"

――――――――――――
🎨 @_chanakya___ 👌🏼♥️🔥
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शेतीविषयक धोरण...🌱

_"शेतकरी सुखी,रयत सुखी तर राजा सुखी" हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते.
स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते.
शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते.
महाराज जमतेम ५० वर्षे जगले.त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व तर निर्माण केले होतेच शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता.

भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो.
सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात.
त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत,हे आमचे दुर्दैव.
१६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजे होते की त्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती.

शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान होते.
संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ उपजिविकेचे साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे.
"शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी'.
हे सूत्र महाराजांना समजले होते.
त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन रयतेला मजबूती देणारा होता.

महाराजांचे गुरुवर्य संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, "मढे झाकूनिया करती पेरणी".
त्या काळात शेतीला किती महत्त्व होते, हे लक्षात येते.
रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जर कामी आला तर त्याचे मढे झाकून काळ्या आईची ओटी भरली पाहिजे,अशी पध्दत होती.

पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी सज्ज होत.
त्याकाळी नांगरणी,कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे.
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत.
त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही.
प्रजेची, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार,व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते...

राजा सह्याद्रीचा ⚔️ 🚩
राजा शेतकऱ्यांचा 🎋
राजा कष्टकरी कुणब्यांचा 🌱
4 था श्रावणी सोमवार गोकुळाष्टमी
युध्दकाळापेक्षा शांततेच्या काळातच शिवरायांची आम्हाला जास्त भिती वाटायची ⚔️🔥
-- शत्रू / गनिम
_ढोल ताशे घुमत आहेत कानात_
_शहारे अंगावरती काटा येत आहे,_
_विघ्ने दूर करण्यासाठी विघ्नहर्ता लवकरच_
_माझा बाप्पा येत आहे 🙇🏻‍♂️🚩_
गणपती बाप्पा मोरया
“बैलपोळा” निम्मित सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा💚💐!!
_*जरी पडतील मस्त खिंडारे तटबुरुजाला तरी तो माना टाकणार नाही. जरी चि-यातली चुनखडी गेली तरी भक्कमपणा संपणार नाही.*_

*#राजधानी*
_*काळ ओसरुन जातो, पण आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा मागे ठेऊनचं...!*_

*#शिवजन्मभूमी*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
संकट कितीही मोठ असुद्या त्याला समोर जाण्याची जिद्द असली पाहिजे.

समोरचा किती पाण्यात आहे व आपल्या पेक्षा किती हुशार आहे हे समजते.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
देश, देव, धर्म, जात यांच्या साठी रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत लढू
🚩💐🙏🏻 बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय 🙏🏻💐🚩
लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा त्याआधी तुमच्या डोळ्यात आदर असावा; नाही का ?
2024/09/08 02:29:02
Back to Top
HTML Embed Code: