Telegram Group & Telegram Channel
या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला..
.
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली..
.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले..
● प्रमुख लढाया :
•इ.स.१७०२-कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
•इ.स.१७०६-जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
•इ.स.१७१०-ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (खांदेरी) कब्जा.
•इ.स.१७१२-मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी याचे खाजगी जहाज पकडले. ३०,००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
•इ.स.१७१३-ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
•इ.स.१७१७-ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०,००० रुपयांची खंडणी वसूल केली.
•इ.स.१७१८- मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
•इ.स.१७२०-ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
•इ.स.१७२१-अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा एकत्रित हल्ला असफल.
•इ.स.१७२३-ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.
.
कान्होजींनी मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोकणपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजीं आंग्रेंची जहाजे त्रावणकोर कोचीनपासून उत्तरेस सुरत कच्छपर्यंत समुद्रातून निर्विवाद संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीच्या धंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने देखील त्यांनी उभारले..
.
अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय.एन.एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे..
.
संदर्भ : कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची.
लेखक : श्री.मनोहर माळगावकर.
कुलाबकर आंग्रे सरखेल.(आंग्रे घरण्याचा इतिहास).
लेखक : दामोदर गोपाळ ढबू.
.
――――――――――――
📷 @kadaki_trekkers 👌🏼♥️🔥



tg-me.com/shrimantyogi1/3286
Create:
Last Update:

या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला..
.
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली..
.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले..
● प्रमुख लढाया :
•इ.स.१७०२-कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
•इ.स.१७०६-जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
•इ.स.१७१०-ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (खांदेरी) कब्जा.
•इ.स.१७१२-मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी याचे खाजगी जहाज पकडले. ३०,००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
•इ.स.१७१३-ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
•इ.स.१७१७-ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०,००० रुपयांची खंडणी वसूल केली.
•इ.स.१७१८- मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
•इ.स.१७२०-ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
•इ.स.१७२१-अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा एकत्रित हल्ला असफल.
•इ.स.१७२३-ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.
.
कान्होजींनी मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोकणपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजीं आंग्रेंची जहाजे त्रावणकोर कोचीनपासून उत्तरेस सुरत कच्छपर्यंत समुद्रातून निर्विवाद संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीच्या धंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने देखील त्यांनी उभारले..
.
अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय.एन.एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे..
.
संदर्भ : कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची.
लेखक : श्री.मनोहर माळगावकर.
कुलाबकर आंग्रे सरखेल.(आंग्रे घरण्याचा इतिहास).
लेखक : दामोदर गोपाळ ढबू.
.
――――――――――――
📷 @kadaki_trekkers 👌🏼♥️🔥

BY श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩


Warning: Undefined variable $i in /var/www/tg-me/post.php on line 283

Share with your friend now:
tg-me.com/shrimantyogi1/3286

View MORE
Open in Telegram


श्रीमंतयोगी Telegram | DID YOU KNOW?

Date: |

Telegram announces Search Filters

With the help of the Search Filters option, users can now filter search results by type. They can do that by using the new tabs: Media, Links, Files and others. Searches can be done based on the particular time period like by typing in the date or even “Yesterday”. If users type in the name of a person, group, channel or bot, an extra filter will be applied to the searches.

For some time, Mr. Durov and a few dozen staffers had no fixed headquarters, but rather traveled the world, setting up shop in one city after another, he told the Journal in 2016. The company now has its operational base in Dubai, though it says it doesn’t keep servers there.Mr. Durov maintains a yearslong friendship from his VK days with actor and tech investor Jared Leto, with whom he shares an ascetic lifestyle that eschews meat and alcohol.

श्रीमंतयोगी from it


Telegram श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
FROM USA